नवी दिल्ली : भारत आणि चिनचे लष्कर लडाखमधील पॅनगॉंग टीसो भागात आमने सामने आले होते. त्यामुळे निर्माण झालेला तणाव दोन्ही सैन्यदलातील स्थानिक अधिकाऱ्यामच्या बैठकी नंतर निवळला असल्याची माहिती लष्करातील सुत्रांनी दिली.
सीमा दलाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत या तणावावर चर्चा झाली. त्यानंतर हा तणाव निवळला. पॅनगॉंग टीसो भागात दोन्ही सैन्य दलाचे जवान भिडले होते. त्यांच्यात दगडफेकीच्या घटनाही घडल्या. मात्र, अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर हा तणाव निवळला.
काश्मीरमधून 370 कलम काढून घेतल्यानंतर आणि लडाखला केंद्र शासनाचा दर्जा दिल्याने चीनने संताप व्यक्त केला आहे. त्यानमरे दोन्ही देशात तणावाचे वातावरण होते.