पुणे – महापालिकेत सामविष्ट झाल्यानंतरही विकास न झाल्याने आमरण उपोषणास बसलेल्या गावकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. ही घटना कात्रज येथे घडली. मागील दोन दिवसांपासून गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत उपोषण सुरु केले होते. पोलिसांनी मंगळवारी दुपारी लाठीचार्ज करत गावकऱ्यांना हुसकावून लावले .
सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार कात्रज चौकात नमेश बाबर यांच्याकडून आंदोलन सुरु होते. पुणे महापालिकेत कात्रज परिसराचा समावेश होऊन 25 वर्षे झाली. मात्र मुलभूत सुविधा आणि विकास होत नसल्याचा स्थानिकांचा आरोप होता. यामध्ये कात्रज , गुजर – निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी परिसरातील नागरिकही उपस्थित होते. चौकातील वाहतूक कोंडी, पाणीप्रश्न, महापालिकेचा दावाखाना, मेट्रो अशा अनेक मागण्या लावून धरण्यात आल्या होत्या.