मुंबई – महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने आगमन केलं आहे. मुंबईसह ठाणे जिल्हा, पालघर, नवी मुंबई, रायगडसह संपूर्ण कोकणात पाऊस चांगलाच कोसळतोय. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडता घरातच राहणं अपेक्षित आहे.
विशेष म्हणजे हवामान विभागाने पुढच्या दोन दिवसांसाठी महाराष्ट्रासाठी काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट तर, काही भागांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुढच्या दोन दिवसांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असून, रेड अलर्ट जारी केला आहे.
पुणे जिल्ह्यातील घाट क्षेत्राला आजपासून (दि. 25) पुढील दोन दिवस ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. दरम्यान 25, 26, 27 जुलै रोजी पुणे जिल्ह्यात अतिमुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची अधिक शक्यता आहे, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
#WATCH | IMD Senior Scientist RK Jenamani says “The red alert warning on July 25 is mainly for the South Konkan area, coastal Karnataka. Telangana saw the highest rain in the last 24 hours in Nizamabad with 400 mm of rainfall. The red alert is mainly for Karnataka, Telangana,… pic.twitter.com/uVRNFhRgqO
— ANI (@ANI) July 25, 2023
रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा (घाट क्षेत्र) या जिल्ह्यांना आज (दि.25 जुलै), तर रायगड, रत्नागिरी, पुणे (घाट क्षेत्र), सातारा (घाट क्षेत्र) या जिल्ह्यांना उद्या (दि.26 जुलै) ‘रेड अलर्ट’ असून, अतिवृष्टीची अधिक शक्यताअसल्याचे मुंबई हवामान प्रादेशिक केंद्राने सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील घराबाहेर पडणे टाळावे असं सांगितलं आहे. पुणे शहरात देखील गेल्या आठवड्याभरापासून पावसाने चांगलीच हजेरी लावल्याचं दिसून येत आहे.