Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील प्रयत्न करत आहेत. राज्यभरात त्यांचे दौरा सुरू झाले आहे. अनेकदा त्यांनी आपल्या सभांमधून सरकारलाई इशारा दिला होता. त्यानंतर आ मराठा आरक्षणाच्या लढाईची पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे यांनी आज महत्वाची बैठक आंतरवाली सराटीमध्ये बोलावली आहे. सकाळी 9 वाजता या निर्णायक बैठकीला सुरुवात होणार आहे. जालन्यातील अंतरवाली सराटीतच ही बैठक होणार आहे. या बैठकीत सरकारकडून आरक्षणासंदर्भात काय झालं आणि पुढील आंदोलनाची दिशा काय असणार यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.
मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेल्या 24 डिसेंबरच्या अल्टीमेंटमनंतर आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज आंतरवाली सराटीमध्ये मराठा समाज बांधवांची राज्यव्यापी बैठक अयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला, राज्यभरातील संव्यसेवक, समनव्यक, सभांचे आयोजक, तसेच वकील, डॉक्टर आणि आरक्षण विषयातील तज्ज्ञ मंडळी असणार आहे. 14 ऑक्टोबर रोजी अंतरवली सराटीमध्ये झालेल्या ऐतिहासिक सभेच्या ठिकाणीच ही सभा अयोजित करण्यात आली आहे.
दरम्यान, मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरची मुदत दिली होती. त्याप्रकरणी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी मराठा आरक्षणाबाबत जरांगेंनी 24 डिसेंबरचा आग्रह धरू नये असं आवाहन केले आहे. काल सरकारी शिष्टमंडळाने मनोज जरांगेंची रूग्णालयात भेट घेतली आणि सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
सरकारकडे क्युरेटिव्ह पिटीशन आणि मागासवर्ग आयोग असे दोन पर्याय आहेत, टिकणारं आरक्षण देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्यासाठी वेळ लागेल. न्या. संदीप शिंदे समितीने केलेल्या कामामुळे लाखो मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या. आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी महाजन यांनी केली. तसेच, सध्या जरांगे आणि भुजबळांमध्ये रंगलेल्या वाक्युद्धावरही गिरीश महाजनांनी प्रतिक्रिया दिली आहे.