नवी दिल्ली – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मध्ये जातील अशा अटकळी बांधल्या जात आहेत त्यावर प्रतिक्रीया देताना बिहार मधील काँग्रेस नेते तारिक अन्वर यांनी म्हटले आहे की, की नितीश यांनी आधीच दोनदा बाजू बदलली आहे आणि जर त्यांनी तिसऱ्यांदा असे केल्यास बिहारच्या लोकांच्या नजरेतील त्यांची प्रतिमा नष्ट होईल.
ते म्हणाले की, बिहारमध्ये जी राजकीय अस्थिरता निर्माण होत आहे ती भाजपनेच निर्माण केली आहे कारण त्यांना इंडिया आघाडीची मोठी चिंता आहे मला अजूनही वाटते की नितीश कुमार असे कोणतेही पाऊल उचलणार नाहीत ज्यामुळे त्यांची आणि त्यांच्या पक्षाची प्रतिमा खराब होईल. याआधीही दोनदा बाजू बदलली आणि तिसऱ्यांदा तसे केले तर बिहारच्या लोकांच्या नजरेत त्यांची प्रतिमा नष्ट होईल, असे ते म्हणाले.
नितीशकुमार हे एनडीए बरोबर गेल्यास इंडिया आघाडीचे नुकसान होईल, हे कोणीही नाकारू शकत नाही, पण आमच्या आघाडीत अन्यही इतर पक्ष आहेत. असे झाले तर आम्ही सर्वजण मिळून त्याचा सामना करू,” असे ते म्हणाले.
पण नितीश भाजपबरोबर जातील असे आम्हाला वाटत नाही. कारण जेव्हा त्यांनी भाजप सोडला तेव्हा ते म्हणाले होते की भाजप हा एक जातीयवादी पक्ष आहे, ज्याला देशातील बंधुता संपवायची आहे, भाजपला लोकशाही संपवायची आहे, असा आरोपही त्यांनी केला होता. त्यामुळे मला वाटत नाही की ते पुन्हा भाजप बरोबर जातील.
भाजपचा देश व्यापी मुकाबला करण्यासाठी नितीशकुमार यांनी इंडिया आघाडी स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला होता. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून त्यांनी त्या सर्वांना एका आघाडीत आणले होते. त्यामुळे नितीशकुमारच ही आघाडी सोडू भाजपरबरोबर जात असतील तर इंडिया आघाडीपुढे आव्हानाची स्थिती निर्माण होणार आहे.