upendra limaye – अभिनेता रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि अनिल कपूर स्टारर ‘अॅनिमल’ (Animal) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रिलीजच्या दिवशीच रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. ‘ॲनिमल’ (Animal) यावर्षातील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा ओपनिंग चित्रपट बनला असून, भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं 312.96 कोटींची कमाई केली आहे. तर वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी बोलायचे झाले तर इतक्यात चित्रपटानं 500 कोटींचा आकडा पार केला आहे.
या सिनेमात रणबीर कपूर आणि रश्मिकाची केमिस्ट्री आणि रोमँटिक सीन लोकांना खूप आवडले. त्याचबरोबर अभिनेत्याचा दमदार अंदाज देखील प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे. दरम्यान, असं असलं तरी सध्या सगळीकडे सिनेमातील एका फायटिंग सीनची चर्चा चांगलीच रंगली आहे. या सीनमध्ये अजय-अतुलच्या एका मराठमोळ्या गाण्याचा वापर करण्यात आला आहे. “डॉल्बी वाल्या” गाण्याचा तडका यावेळी प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला आहे.
तसेच, चित्रपटात उपेंद्र लिमये ( upendra limaye ) या मराठमोळ्या अभिनेत्यानं एक महत्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात उपेंद्र हे रणबीरला एक मशीन गन दाखवतात. जी मशीन गन महाराष्ट्रामध्ये असेंबल करण्यात आलेली असते. सध्या या सीनची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. उपेंद्र लिमयेच्या दमदार एन्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली असल्याचं यातून दिसून आलं आहे.
दरम्यान, अॅनिमल चित्रपटातील आपल्या भूमिकेविषयी स्वतः उपेंद्र लिमये ( upendra limaye) यांनी काही खुलासे केले आहेत. एका प्रसिद्धीवृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलताना अभिनेता म्हणाला की, ”दिग्दर्शक संदीप रेड्डी यांच्या असिस्टंटचा मला फोन आला होता. ‘उपेंद्र सर टी सिरिजचा एक चित्रपट येतोय. त्यात एक सीन आहे. तुम्ही कराल का?’, असं त्यांनी मला विचारलं होतं. ‘एक सीन आहे तर मला इंटररेस्ट नाही. मी करणार नाही.’, असं मी त्यांना सांगितलं. त्यानंतर त्यांनी पुन्हा मला विचारलं, ‘अर्जुन रेड्डीचे दिग्दर्शक संदीप रेड्डी यांचा सिनेमा आहे.”
त्यांना भेटल्यानंतरही नकार द्यायचंच मी ठरवलं होतं. मिटिंगमध्ये त्यांनी मला हा एक हाय वोल्टेज ड्रामा असल्याचं सांगितलं. त्यांनी ज्या प्रकारे तो सीन मला सांगितला, खरंतर त्यामुळे मी या चित्रपटासाठी होकार द्यायचं ठरवलं. सीनमध्ये कुठेही व्हिएफएक्स वापरायचं नाही हेही त्यांनी ठरवलं होतं. त्यांनी मला मशीनचा फोटोही दाखवला. एका वेगळ्या लेवलचा तो सीन करायचा हे त्यांच्या डोक्यात होतं.
ते अॅक्शन सीक्वेन्स अजय-अतुल यांच्या गाण्यावर कट करणार, हे सगळंच त्यांनी ठरवलं होतं. त्यांनी हा सीन सांगितल्यावर मी स्पेशल अपेरियन्स करायचा असं सांगितलं. ‘तुला हवं ते करू, पाहिजे तर मी टायटलला तुला स्पेशल अपेरियन्स असं देतो. पण तूच कर’, असंही ते मला म्हणाले. त्यांनी माझी फार कामंही बघितली नव्हती. ‘सरकार राज’मधलं काम त्यांना प्रचंड आवडलं होतं.” यावेळी असा किस्सा उपेंद्र यांनी सांगितला.