Namrata Sambherao : ‘कुर्ररर’ नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. असे असताना देखील अभिनेत्री नम्रता संभेराव (Namrata Sambherao)आणि अभिनेता प्रसाद खांडेकरने काही दिवसांपूर्वी या नाटकातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. नाटकातून माघार घेण्याच्या दोघांच्या या निर्णयानंतर चाहत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली. तसेच कुर्ररर नाटक सोडण्यामागचे कारण विचारले. मात्र यावर आता नम्रता संभेरावने मौन सोडले आहे. नम्रताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत खुलासा केला आहे.
नम्रताने सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट शेअर करत लिहिले की, “कुर्रर्रर्र ह्या नाटकातली माझी भूमिका पूजा I will miss u so much माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचं नाटक. माझी भूमिका मी अक्षरशः जगले. माझ्या आयुष्यातलं अभिनयाचं पहिलं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं बक्षीस ह्याच नाटकाने मिळवून दिलं मला. कोविड काळानंतर आम्ही कलाकारांनी एकमेकांच्या विश्वासावर उभं केलेलं हे नाटक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं प्रेम केलं, अत्यंत व्यस्त schedule मधून आम्ही कुर्रर्रर्र ह्या नाटकाचे 2 वर्षात 200हुन अधिक प्रयोग केले.”
तिने पुढे लिहीते, “पण व्यस्त तारखांमुळे प्रयोगांची संख्या कमी झाली backstage आणि सहकलाकारांना जास्तीत जास्त प्रयोग करता यावेत आणि नाटकाचे आणखी भरघोस प्रयोग व्हावे ह्यासाठी सर्वानुमते घेतलेला हा निर्णय आहे. काळजावर दगड ठेवून घेतलेला निर्णय काय असतो पहिल्यांदा अनुभवला पण हा निर्णय चांगल्या भावनेने घेतला गेला आहे नाटकासाठी च घेतला आहे आणि तुम्ही रसिक प्रेक्षक आमच्या निर्णयाचा मोठ्या मनाने स्विकार कराल अशी खात्री आहे. ह्यापूर्वी जसं प्रेम केलंत तसंच प्रेम तुम्ही रसिक प्रेक्षक आमच्या कुर्रर्रर्र ह्या नाटकावर नवीन संचावर कराल अशी आशा आहे.”
View this post on Instagram
नम्रता शेवटी लिहीते, “मी अजूनही आमच्या म्हणतेय कारण शारीरिकरित्या exit घेतली तरी त्या नाटकाशी मी मनाने जोडले गेलेय, तिथून कधीच exit होत नसते. माझ्या शुभेच्छा कायम सोबत असतील. जिची खरंच कुठे शाखा नाही अशी विशाखा ताई विनोदाचा बाप पॅडी दादा माझी अत्यंत जवळची मैत्रीण मयुरा रानडे आणि supreme प्रियदर्शन दादा तुम्हाला व कुर्रर्रर्र च्या सर्व टीम ला पुढील प्रयोगांसाठी housefull शुभेच्छा. रंगमंचापासून फार काळ लांब राहूच शकत नाही. भेटू लवकरच…”, या पोस्टद्वारे तिने पुन्हा एकदा रंगमंचावर काम करण्यास सज्ज होणार असल्याचे म्हंटले आहे. नम्रता आणि प्रसादनंतर या नाटकात अभिनेता प्रियदर्शन जाधव आणि अभिनेत्री मयुरा रानडे यांची एन्ट्री झाली आहे.