उरूळी कांचन-हवेली, पुरंदर, दौंड तालुक्यांतील गावांची महत्त्वाची बाजारपेठेतील उलाढाल थंडावली आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांतील हवामानातील बदल, दुष्काळ, परतीच्या पावसाचा फटका, नोटबंदी आदी कारणांमुळे शेतकरी आणि नागरिकांच्या हातात चलन खेळते राहत नसल्यामुळे ग्राहकांनी बाजारपेठेकडे पाठ फिरविली आहे.
यंदा दीपावलीतही उलाढाल फारशी समाधानकारक झाली नाही. त्याचा परिणाम उलाढालीवर झाला आहे. उरूळी कांचनच्या बाजारपेठेत हवेली तालुक्यातील गावे आणि दौंड आणि पुरंदर तालुक्यातील हवेलीला खेटून असलेल्या गावांतील नागरिक बाजारहाट करण्यासाठी येतात.