संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांसाठी घरबांधणी
पुणे – सामाजिक दृष्टिकोनातून घरबांधणी क्षेत्रात कार्यरत असलेल्या पुण्यातील न्याती समूहाने संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यासाठी स्वाभिमान नावाची घर निर्मिती योजना सुरु केली आहे.संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी घरबांधणी योजना सुरू करणारा न्याती समूह हा पहिला समूह आहे.
1997 मध्ये 100 लष्करी अधिकाऱ्यांनी पुण्यातील न्याती समूहाचे डॉ. नितीन न्याती यांच्याशी चर्चा करून संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी गृहनिर्माण योजना सुरू करण्यावर चर्चा केली होती. त्यानंतर न्याती समूहाने संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आतापर्यंत 4 हजार घरे तयार केली आहेत. स्वाभिमान योजनेअंतर्गत या घरांची निर्मिती केली जात आहे. संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा आदर राखत त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करणे हा स्वाभिमान योजनेचा हेतू आहे.
आता न्याती समूहाने आपल्या कार्याची 25 वर्षे पूर्ण केली आहेत. आगामी काळातही विविध क्षेत्रात सक्रिय राहण्याचा संकल्प न्याती समूहाने केला आहे. 1997 पासून पुण्यात सक्रिय असलेल्या न्याती समूहाने 30 दशलक्ष वर्ग फूटाचे निवासी आणि व्यावसायिक बांधकाम पुणे आणि परिसरात केले आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवरही हा समूह इंजिनिअरिंग, कॉन्ट्रॅक्ट या क्षेत्रात कार्यरत आहे.
दक्षिण पुण्यामध्ये न्याती समूह पंचतारांकित कॉरिंथियन्स रिसोर्ट अँड क्लब व एन एल हेल्थकेअरद्वारे सक्रिय आहे. गेल्या वर्षी न्याती समूहाने 500 लोकांचे लसीकरण करून सामाजिक क्षेत्रात पुढाकार घेतला होता. हे लसीकरण संचेती इस्पितळात झाले. यावेळी न्याती समूहाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ. नितीन न्याती आणि इतर उपस्थित होते.