ठराविक लोकांनीच होळी पेटविण्यावर गोपाळ समाजाचा आक्षेप
नगर – पाथर्डी तालुक्यातील मढी येथील मानाची होळी 9 मार्च रोजी पेटवण्यात येणार आहे .ही मानाची होळी पेटवण्याचा बहुमान गोपाळ समाजाकडे आहे. परंतु समाजातील ठराविक लोकांना दर वर्षी होळी पेटवण्याचा मान मिळतो, त्यामुळे या वर्षी नवीन लोकांना हा मान मिळावा व कार्यक्रमास पोलीस संरक्षण मिळावे असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
मढी येथील मानाची होळी पेटवण्यावरून दरवर्षी दोन गटात वाद होता. या वर्षी हा वाद उफाळून आला आहे गोपाळ समाजातील पुंडलीक धनगर, शंकर पवार, भाऊसाहेब चौगुले, बाळासाहेब पवार, भरत गव्हाणे, पोपटराव गव्हाणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, 26 फेब्रुवारी 1990 मध्ये पाथर्डी न्यायालयामध्ये दाखल प्रकरणात तडजोड होऊन सुले नामा झाला. या सुने नाम यानुसार सर्व समाजाने सामूहिक होळी पेटवण्याचा निर्णय झाला. पूर्वीच्या मानकऱ्यांना मान या लागत नाही सुलेनाम यानुसार पूर्णपणे रद्द केलेला आहे. तसेच वेगवेगळ्या लोकांना हा मान देण्याचा निर्णय झालेला आहे .
त्यामुळे यावर्षी 9 मार्च रोजी अर्जदारांना होळी पेटवण्याचा मान मिळवा. तसेच पाथर्डी तहसिलदाराकडील अर्जावर कोणताही निर्णय झालेला नाही .त्यामुळे मढी देवस्थानने परस्पर मानकरी ठरू नयेत असे या निवेदनात म्हटले आहे. मढी येथील मानाची होळी पेटवण्याचा मान नवीन व्यक्तींना रोटेशन पद्धतीने देण्यात यावा. याबाबत गोपाळ समाजातील प्रतिनिधींनी ठराव करून नवीन मानकर याबाबतचे निवेदनही देवस्थान ट्रस्टला दिले होते.
नवीन लोकांना होळीचा मान मिळावा अन्यथा यावर्षी संपूर्ण भारतातून येणारे समाज बांधव होळीच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार आहे याबाबत कायदेशीर लढाई चालू ठेवणार आहे.
भाऊसाहेब चौगुले पुणे जिल्हा अध्यक्ष गोपाळ समाजहित महासंघ