बहिण भावांचा अतूट प्रेम आणि नात्यांचा सण म्हणजे रक्षाबंधन , याच सणाच्या निमित्ताने वाघोलीतील संपत आबा गाडे कुटुंबीयांनी ज्ञानेश्वर माऊलींना दोन तोळ्या पेक्षा जास्त वजनाची सोन्याची राखी अर्पण केली आहे. वारकरी मंडळी हे ज्ञानेश्वर माऊलींना आपला देव, माय, बाप, बहीण, भाऊ अस सर्व काही समजतात, अशा आपल्या बंधू स्वरूप ज्ञानेश्वर माऊली प्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वाघोली येथील संपत आबा गाडे ह्या वारकरी कुटुंबीयांनी सोन्याच्या राखी ज्ञानेश्वर माऊलीला अर्पण करून रक्षाबंधनाचा सण साजरा केला आहे. तसेच यंदा पडलेल्या दुष्काळातून राज्यातील शेतकऱ्यांना शासकीय मदतीचा आर्थिक दिलासा मिळू दे आणि शेतकऱ्यांची सुख, शांती आणि समृध्दीने भरभरून प्रगती होऊ दे अशी मागणी देखील गाडे कुटुंबीयांनी कैवल्यसम्राज चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊली कडे केली आहे. यावेळी भीमाबाई गाडे,संपत आबा गाडे,स्नेहा गाडे, राज गाडे,व्यवस्थापक आळंदी मंदीर ज्ञानेश्वर वीर आदी मान्यवर उपस्थित होते.