लखनौ – मणिपूरमधील स्थिती सर्वसामान्य आहे, हे सिद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने “जी-20′ ची बैठक मणिपूरमध्ये आयोजित करून दाखवावी, असे आव्हान समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केंद्र सरकारला दिले आहे.
जर मणिपूरमधील स्थिती पूर्वपदावर येत असेल, तर “जी-20′ ची बैठक मणिपूरमध्ये आयोजित का केली जात नाही, असा प्रश्न त्यांनी केला. “जी-20′ विषयीच्या एका वार्तालापाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
“जी-20′ परिषदेच्या निमित्ताने वर्षभरात उत्तर प्रदेशात आणि देशभर अन्यत्रदेखील अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे. जर या कार्यक्रमांचे श्रेय भाजपला घ्यायचे असेल, तर भाजपने या बैठकांच्या आयोजनाचा खर्च स्वतः करावा.
हा खर्च सरकारने का करावा, असा प्रश्नही अखिलेश यादव यांनी विचारला. नवी दिल्लीमध्ये “जी-20’ची बैठक घेण्ययाला काहीच आक्षेप नाही. मात्र सध्याच्या घडीला मणिपूर हा महत्त्वाचा मुद्दा आहे, असेही त्यांनी सांगितले.