केतकावळे -करोनामुळे पर्यटक निसर्गरम्य वातावरणापासून दूर होते. मात्र, आता सर्रासपणे पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडले आहेत. पुरंदर तालुक्यातील कानिफनाथ गडावर पर्यटकांनी सध्या गर्दी केली असल्याने गडावर कचरा देखील वाढला आहे.
त्यामुळे निसर्गप्रेमी ग्रुपच्या वतीने साफसफाई करण्यात आली. निसर्गप्रेमीकडून यावेळी गडावर प्लॅस्टीक बॉटल, इतर प्लॅस्टीक टाकू नका, आपल्याबरोबर परत घेऊन जा या आशयाचे फलक जनजागृतीसाठी लावण्यात आले.
यावेळी ग्रुपचे शशी पासलकर, अविनाश वनमाले, प्रवीण शिंदे, आशिष जाधव, संतोष माने, महेश सुंटले, राहुल प्रधान, वेदांत सुंटले, अजित जांभूळकर, दिलावर सय्यद, नितीन बनकर, डॉ. साकेत टिळेकर, सचिन पोखरणा, रमेश जखाते, नीलेश गुंळुंजकर, आदित्य गुंळुंजकर, रमेश भंडारी, राज क्षेत्री, नागाश्री माळी, किरण जगताप उपस्थित होते.