नवी दिल्ली – राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत पुढच्या एका वर्षासाठी मोफत रेशन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या योजनेचा फायदा देशभरातील 81 कोटीहून अधिक नागरिकांना होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत नागरिकांना दरमहा दोन ते तीन रुपयांमध्ये 5 किलो अन्नधान्य दिले जातात.
अंत्योदय अन्न योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या कुटुंबाना दर महिन्याला 35 किलो अन्नधान्य देण्यात येतात. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत नागरिकांना तीन रुपये किलोने तांदूळ, तर दोन रुपये किलोने गहू दिले जातात. या योजनेमुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर दोन लाख कोटी रुपयाचा बोजा पडणार आहे.