रेडा – पालकांनी दिलेल्या पॉकेट मनी मधून झालेल्या बचतीतून इंदापूर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून 100 कुटुंबाला 15 दिवस पुरेल इतके अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे. सर्वसामान्य जनता घरात बंद असताना दैनंदिन गरजा मोलमजुरी करणाऱ्या व्यक्तीने कशा पूर्ण करावयाच्या याची चर्चा कॉलेज कट्ट्यावर न होता ती मोबाइलच्या व्हॉट्सऍप ग्रुपवरून झाली.
त्यानंतर 13 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन 350 किलो गहू, 150 किलो साखर, 150 किलो तांदूळ, 75 किलो शेंगदाणे, पोहे, 150 किलोचे तेल पाकीटे, मीठ, लालमिरची पावडर, जिरे, मोहरी, हळद, साबण, आदी साहित्याची पाकिटे तयार केली. त्यांचे वाटप 100 कुटुंबांना करण्यात आले.
यामध्ये निखिल महाजन, प्रशांत उंबरे, अतुल दळवी, ऋषिकेश मोरे, प्रणव स्वामी, प्रतीक जाधव, रोहित साळुंखे, वशिम बागवान, गणेश करे, प्रसाद देवकाते, सुजित दांडेकर, रोहित जाधव, केदार नागपुरे आदी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.