मुंबई – नव्याने स्थापन झालेल्या विरोधकांच्या “इंडिया’ आघाडीच्या बोधचिन्हाचे अनावरण 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान मुंबईमध्ये होणाऱ्या बैठकीदरम्यान होण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये सामील होण्यासाठी देशातील विरोधी पक्षातील प्रमुख नेते मुंबईत दाखल झाले. अशात मुंबईत आज जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरस पक्षाचे माजी अध्यक्ष फारुक अब्दुल्ला मुंबईत दाखल झाले आहे. मुंबईत येताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
#WATCH | Mumbai | On a consensus over seat-sharing of INDIA alliance parties for Lok Sabha election, NC president Farooq Abdullah says, “Why do worry? What has to happen, will happen. Only God knows what will happen. We have to make an effort to get a majority.”
On BJP’s claim… pic.twitter.com/aWnd0gHlCM
— ANI (@ANI) August 30, 2023
यावेळी फारुक अब्दुल्ला म्हणाले,’मुंबईत देशभरातील अनेक नेते येणार आहे. या देशातील एकता आणि अनेकता महत्त्वाची आहे. हा देश सर्वांचा आहे. अनेकता मजबूत असेल तर एकता मजबूत होईल. भारताच्या समस्या दूर करण्याकरता आपल्याला सर्वांना अनेकताला मजबूत करायचं आहे”, असं अब्दुल्ला म्हणाले.
दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी इंडीआयच्या आघाडीच्या पक्षांच्या जागावाटपावर फारूख अब्दुल्ला म्हणाले, “काळजी कशाला करायची? जे व्हायचे आहे ते होईल. काय होईल ते फक्त देवालाच माहीत. बहुमत मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील .’ 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 300 पेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या भाजपच्या दाव्याबद्दल फारूख अब्दुल्ला पुढे म्हणाले, ‘त्यांनी नेहमीच दावा केला आहे. मला वाटते की त्यांना देवाकडून संकेत मिळाला आहे की ते या अनेक जागा जिंकतील. मात्र अशा प्रकारचा आम्हाला देवाकडून कॉल आला नाही. आम्हाला अद्यापही देवाचा फोन आलेला नाही, देवाचा फोन आला की आम्ही कळवू”, असंही मिश्कीलपणे फारुक अब्दुल्ला म्हणाले.