नवी दिल्ली – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षिततेशी निगडित अलीकडेच उद्भवलेल्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी, डीआरडीओ, बंगळुरुची भारतीय विज्ञान संस्था आणि विशाखापट्टणमची नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळा या संस्थांमधील तज्ञ सदस्यांची एक समिती नेमण्यात आली आहे.
त्यांनंतर तीन वाहन उत्पादकांनी आपली वाहने परत मागवली आहेत. ओकिनावा ने 16 एप्रिल रोजी 3,215 वाहने परत मागवली आहेत. प्युअर ईव्ही ने 21 एप्रिल रोजी 2,000 वाहने, आणि ओला इलेक्ट्रिक ने 23 एप्रिल रोजी 1,441 इलेक्ट्रिक वाहने परत मागवली आहेत.
इलेक्ट्रिक वाहनांच्या तपासण्या निश्चित मापदंडानुसार केल्या जातात. केंद्रीय मोटार वाहन कायद्याच्या नियमात, हे मापदंड स्पष्टपणे मांडण्यात आले आहेत, असे केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर यांनी आज लोकसभेत सांगितले.