आज आपल्या सर्वांकडे स्मार्टफोन आहे. ऑनलाइन शॉपिंग करायचं असो, कुठलीही सरकारी समस्या सोडवायची असो, शिक्षणापासून मनोरंजनापर्यंत, या सगळ्या गोष्टी आपण मोबाईलच्या मदतीने सहज करत असतो. आपल्या सर्वांना स्मार्टफोन आवडतात. त्याच वेळी, ते वापरताना, आपण काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही या गोष्टींची काळजी घेतली नाही तर तुमचा फोन लवकर खराब होऊ शकतो. अशा स्थितीत तुमच्या स्मार्टफोनचे आयुष्यमान खूपच कमी होते. याशिवाय त्यात अनेक समस्या येतात किंवा अनेक फंक्शन्स काम करणे बंद करतात. अशा परिस्थितीत मोबाईल फोन वापरणाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. चला, जाणून घेऊया त्या चुकांबद्दल, ज्या तुम्ही स्मार्टफोन वापरताना अजिबात केल्या नाही पाहिजेत.
‘हा’ फास्ट चार्जर वापरू नका
तुम्ही तुमचा स्मार्टफोन त्याच्या मूळ चार्जरने चार्ज करत नसाल, तसेच मोबाईल चार्ज करण्यासाठी फास्ट चार्जरचा वापर केलात तर ही चूक तुमच्या स्मार्टफोनसाठी महागात पडू शकते. असे केल्याने तुमचा फोन लवकरच खराब होऊ शकतो. तुमचा स्मार्टफोन नेहमी त्याच्या मूळ चार्जरने चार्ज करा.
फोनच्या सुरक्षिततेची काळजी घ्या
अनेकदा आपला फोन चुकून खाली पडतो. अशा परिस्थितीत, तुम्ही निश्चितच संयम ठेवा आणि तुमच्या फोनवर कव्हर ठेवा. असे केल्याने तुमचा स्मार्टफोन सुरक्षित राहतो. यामुळे, भविष्यात जेव्हाही तुमचा फोन चुकून खाली पडेल, तेव्हा तो तुटण्याची किंवा फुटण्याची शक्यता खूप कमी होते.
स्टोरेज फुल ठेवू नका
अनेकदा लोक त्यांच्या स्मार्टफोनचे स्टोरेज पूर्णपणे भरलेले ठेवतात. असे केल्याने तुमच्या मोबाईल फोनच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. याशिवाय फोनचे स्टोरेज जास्त वापरल्यास फोन लवकर हँग होऊ लागतो. या कारणास्तव, तुम्ही फोन मेमरी फ्री ठेवली पाहिजे.
ओव्हर चार्जिंग करू नका
अनेक यूजर्स रात्री स्मार्टफोन चार्जिंगला लावून झोपतात. ही चूक तुम्ही कधीही करू नका. असे केल्याने फोनची चार्जिंग क्षमता खराब होऊ शकते. याशिवाय तुमच्या स्मार्टफोनमध्ये अनेक प्रकारच्या समस्याही येऊ शकतात. अशा परिस्थितीत स्मार्टफोन कधीही ओव्हर चार्ज करू नका.