बेल्हे – देशात व राज्यात करोना बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 14 एप्रिलपर्यंत असणारा लोकडाऊन वाढून 3 मेपर्यंत झाला आहे, यामुळे गोरगरीब जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. राजुरी (ता. जुन्नर) येथील आसिफभाई महालदार मित्र मंडळाच्या वतीने गरजू कुटुंबांना प्रत्येकी 15 दिवस पुरेल इतका संपूर्ण किराणा वाटप करण्यात आला. यावेळी गोविंद औटी, बाळासाहेब हाडवळे, रईसभाई चौगुले, तसेच विद्या विकास मंदिरचे शिक्षक किरण औटी उपस्थिती होते.