मीडिया, कट्टा, चौकात केवळ “सत्ताकरणच’
मंचर- ग्रामीण भागात राजकारणात कोण कोणाचा मित्र होईल आणि कोण कोणाचा शत्रु होईल. याबाबत चर्चेला उधाण आले आहे. गावागावांतीकट्ट्यांवर आणि हॉटेलमध्ये सध्य स्थितीतील राजकारणाबाबत चर्चा रंगु लागल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेसाठी एकत्र येत असल्याचे वरिष्ठ नेत्यांनी सांगितले; परंतु गावपातळीवरील दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र, आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 18 दिवस झाले. तरी सरकार स्थापन झालेले नाही. यासंदर्भात सोशल मीडियावर राजकीय नेते मंडळीची व्यंग चित्रे आणि वेगवेगळ्या पोस्ट टाकून करमणूक करण्यात येत आहे. सोशल मीडियावर सत्ता स्थापनेसाठी होणाऱ्या नवीनयुतीची जोरदार चर्चा सुरू आहे. व्हॉट्सऍप ग्रुपवर ज्येष्ठ नेते शरद पवारांनी भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी मोठी कमाल केल्याने कौतुक होत आहे. तर राज्यात नवीने जुळणाऱ्या महा”शिव’आघाडीबाबत चर्चा झडल्या जात आहे.
पोस्टरबाजीमध्ये माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची छायाचित्रे प्रसिद्ध करून पोस्टरबाजी करण्यात येत आहे. महाशिव आघाडीमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला पुणे जिल्ह्यात मंत्रीपद मिळणार असून त्याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. तर मंत्रीपदासाठी कोणाची वर्णी लागणार. या संदर्भात कार्यकर्ते सोशल मीडियावर चर्चा करु लागले आहे. ठाकरे घराण्यातील मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री जयंत पाटील आणि कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण हे विधानसभा अध्यक्ष होणार, अशा पोस्टही ग्रुपवर फिरू लागल्या आहे.