मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’समोर आज अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हनुमान चालिसा पठण करणार आहेत. दरम्यान शिवसैनिकांनी यास विरोध केला असून मातोश्री बाहेर मोठ्या संख्येने शिवसैनिक एकत्र झाले आहेत. मुंबईत कालपासून हा हाय व्होलटेज ड्रामा सुरु झाला आहे. हनुमान चालीसा म्हणण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही असे म्हणत रवी राणा यांनी आम्ही मातोश्रीवर जाणाराच असा इशारा शिवसैनिकांना दिला आहे. राणा यांच्या इशाऱ्यानंतर युवासेनेचे नेते वरून देसाई यांनी हिम्मत असेल तर येऊन दाखवा असा राणा यांना उलट इशारा दिला आहे.
‘मातोश्री’ आमचे दैवत आहे. तुमची नौटंकी बंद करा, हिम्मत असेल तर येऊन दाखवा असा इशारा हनुमान चालीसा पठण करण्यावर ठाम असलेल्या नवनीत राणा आणि रवी राणा यांना वरुन देसाई यांनी दिला आहे. ‘मातोश्री’बाहेर तुमची वाट पाहत आहोत, शिवसैनिक तुमचे स्वागत करायला आतुर आहेत, आधी शिवसैनिकांचा सामना करा नंतर मातोश्रीवर या. आमच्या दैवतावर कोणीही काही बोलले आणि आम्ही ते खपवून घेऊ, असे चालणार नाही. आधी आमचा सामना करावा लागेल, असेही देसाई म्हणाले आहेत.
बाळासाहेबांचे शिवसैनिक असते तर आम्हाला मातोश्रीवर जाऊ दिले असते : रवी राणा
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालिसाचे पठन करणार आहेत. शुक्रवारी राणा दांपत्य मुंबईत दाखल झाले. दरम्यान मातोश्रीवर मोठ्या संख्येने शिवसैनिक दाखल झाले आहेत. राणा दांपत्य मातोश्रीवर जाण्यााआधी त्यांनी शिवसेना व शिवसैनिकांवर गंभीर आरोप केले आहेत. बाळासाहेबांचे शिवसैनिक असते तर आम्हाला मातोश्रीवर जाऊ दिले असते, बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक उरले नाहीत. रवी राणा व नवणीत राणा मातोश्रीवर जाण्याआधी त्यांनी हे विधान केले आहे.
बाळासाहेबांचे शिवसैनिक असते तर आम्हाला मातोश्रीवर जाऊ दिले असते, बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक उरले नाहीत. मातोश्रीवर जाण्यासाठी आम्ही निघालो असता आम्हाला पोलीसांनी रोखलं असून शिवसैनिकांकडून गुंडगिरी करण्यात येत असल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे. आम्ही चांगल्या हेतूने हनुमान चालिसा पठन करण पण आमच्यावर हल्याचा प्रयत्न सुरु आहे. आमच्या घरावर हल्ला होत आहे, तरीही मातोश्रीवर जाणार असल्याचा इशारा राणा यांनी दिला आहे.
स्वत: मुख्यमंत्री कायदा व सुव्यवस्था बिघडवत आहेत. मातोश्री हे आमच्यासाठी मंदीर आहे. महाराष्ट्राच्या सुखशांतीसाठी आम्ही मातोश्रीवर जाणार आहे. आम्हाला रोखू नये. आम्ही बाहेर पडणार पुढची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असेल. अुनचित प्रकार घडल्यास राज्याचे मुख्यमंत्री जबाबदार असणार असे आरोप करत रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.