मुंबई : राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात टीका टिप्पणी सुरु आहे. जो पैसा वसुलीद्वारे आलाय, त्याचा उपयोग स्वत:च्याच आमदारांना विकत घेण्यासाठी माफिया सेना करतेय अशी टीका सोमय्या यांनी केली होती त्याला उत्तर देताना शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे. “पाच वर्षे शिवसेनेची यात शिवसेना लढेलही आणि जिंकेलही” असे दीपाली यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.
चिरीट तोम्मया आमदार शिवसेनेला मतदान करतीलच
पण विश्वास तुमच्यावर नाही.
दिल्लीचा पैसा आंब्याच्या पेट्या सांगुन
हॅलिकॅाप्टरने उतरवाल यांत शंका नाही.
पाच वर्षे शिवसेनेची यात शिवसेना लढेलही आणि जिंकेलही. @ShivSena @bjpsamvad— Deepali Sayed (@deepalisayed) June 7, 2022
काय आहे सय्यद यांचे ट्विट ?
” चिरीट तोम्मया आमदार शिवसेनेला मतदान करतीलच पण विश्वास तुमच्यावर नाही.दिल्लीचा पैसा आंब्याच्या पेट्या सांगुन हॅलिकॅाप्टरने उतरवाल यांत शंका नाही. पाच वर्षे शिवसेनेची यात शिवसेना लढेलही आणि जिंकेलही.” अशा आशयाचे ट्विट सय्यद यांनी केले आहे.
याशिवाय प्रेषित मोहम्मद यांच्याबाबतच्या विधानाचा मुद्दा देखील राज्यभर चांगलाच गाजतो आहे. त्यावरूनही दीपाली सय्यद यांनी PMO कार्यालयात पाठवलेल्या पत्राबाबत उत्तर कधी मिळणार असा सवाल केला आहे . ” भाजप म्हणजे वादग्रस्त विधानांचा कळस म्हणावे लागेल ! आदरणीय मोदीजी, नुपूर शर्मा प्रकरणा आगोदर महाराष्ट्रातुन तुमच्या दिल्ली PMO कार्यालयात पोहचवलेल्या पत्राचे उत्तर कधी मिळणार ? महाराष्ट्रातील भाजप नेत्यांसाठी न्याय वेगळा करणार का? असे ट्विट दीपाली सय्यद यांनी केले आहे.
काय आहे सोमय्या यांचे वक्तव्य ?
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोडेबाजाराचा आरोप होत असताना किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. “मला हेच समजत नाहीये की काय चाललंय? औरंगाबादला काय आमदार विकत घ्यायला चाललेत का? ही काय अवस्था झालीये शिवसेनेची? सरकारकडून जनतेचा जो पैसा वसुलीद्वारे आलाय, त्याचा उपयोग स्वत:च्याच आमदारांना विकत घेण्यासाठी माफिया सेना करतेय.इतिहासात पहिल्यांदाच असं घडतंय की स्वत:च्या आमदारांना स्वत:कडे ठेवण्यासाठी वसुलीच्या पैशांचा वापर केला जातोय”, असे किरीट सोमय्या म्हणाले होते. त्यावरून दीपाली सय्यद यांनी सोमय्या यांच्यावर टीका केली आहे.