कोरेगाव – धोम धरणामुळे कोरेगाव तालुक्यात पुनर्वसित झालेल्या भिवडी गावाला सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत असून पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीतील पाण्याची पातळी एकदम खालवली आहे. सिमेंट काँक्रीट बंधार्याचे खोलीकरण करून गाळ काढण्यासाठी प्रशासनाने तात्काळ मान्यता द्यावी व शासनाच्या योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामपंचायतीसह ग्रामस्थांच्यावतीने मंगळवारी करण्यात आली.
माजी सरपंच संजय शेलार यांच्या नेतृत्वाखाली माजी सरपंच नामदेव शेलार, विद्यमान सरपंच अर्चना शेलार, विद्यमान उपसरपंच सविता शेलार, माजी उपसरपंच विठ्ठल शेलार, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष व पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष वसंत शेलार, पोलीस पाटील कृष्णा शेलार, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य रोहिदास शेलार, सामाजिक कार्यकर्ते सचिन शेलार, मिलिंद शेलार, सचिन शेलार, योगेश गोळे, निकिंद शेलार, वैभव पोळ, मारुती शेलार दत्तात्रय शेलार यांनी प्रांताधिकारी कार्यालयात प्रभारी नायब तहसीलदार रणजित जाधव व तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार मनोज माने यांना निवेदन सादर करून सिमेंट काँक्रीट बंधार्यातील गाळ काढण्यास मान्यता देण्याची मागणी केली आहे.
संजय शेलार यांनी अधिकार्यांना सांगितले की, सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामासह नैसर्गिकरित्या बंधार्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचला असून पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत पाणी उपलब्ध होत नाही. ग्रामस्थांनी आणि युवकांनी एकत्रित येऊन लोकसहभागातून आणि लोकवर्गणीतून सध्या गाळ काढण्याचा निर्धार केला आहे, मात्र त्यास प्रशासनाची मान्यता घेणे बंधनकारक आहे. राज्य शासनाच्या धोरणानुसार तात्काळ गाळ काढण्यास मान्यता द्यावी व गाळ काढण्यासाठी डिझेलचा खर्च उपलब्ध करून द्यावा, अशी आमची मागणी आहे.