पौड दि. 18 (सचिन केदारी) – वडगाव येथील वाघ पाटील वस्ती दि.12 मंगळवार सायंकाळी पावसाच्या अतिवृष्टीमुळे येथील जमिनीला सुरवातीला लहान भेगा पडल्या होत्या त्या वाढत असून त्याचे लांबचा लांब मोठ्या भेगा मध्ये रुपांतर झाल्या आहेत. पडलेल्या भेगा या दोन ते तीन फूट खोल पडल्या असून अंदाजे वीस ते पंचवीस एकर जमीनीला उताराच्या दिशेने सरकली आहे. पडलेली भेगा या मुळशी धरणाला लागून असल्याने भविष्यात मुळशी धरणाला धोका निर्माण होऊ शकतो.
वडगाव येथील वाघ पाटील वस्तीवरील घरांना तडे गेलेले असून शेतजमीन, फळझाडे, रस्ते, वीज, पिण्याचे पाणी यांचे नुकसान झाले आहे. अचानक पडलेल्या जमिनीच्या भेगा या दिवस वाढेल तशा मोठ्या होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष; नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण
सध्या त्याठिकाणी असलेले सर्व कुटुंबीयांना स्थानिक प्रशासनाने सुरक्षित स्थळी जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत इमारतीमध्ये तात्पुरते स्थलांतरित केले आहे. तसेच जनावरे देखील त्यांच्या बरोबर सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेली आहेत. सदर घटनेत तेथील 6 कुटुंबातील 16 नागरिकांना तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. त्यांचे जेवण तेच करून खात असून त्यांना शासनाकडून अजून कोणत्याही स्वरूपाची मदत मिळाली नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
यावेळी वडगाव ग्रामपंचायत ग्रामसेवक विजय कुदळे ,तलाठी संकेत आव्हाड यांनी भेट दिली.यावेळी गावातील सरपंच अर्चना सुभाष वाघ, सुभाष वाघ, माजी पोलीस पाटील लक्ष्मण वाघ, सुनील रसाळ, नारायण वाघ,भाऊ वाघ, हिरामण वाघ, प्रशांत वाघ, मारुती वाघ, बाळासाहेब वाघ, रामभाऊ वाघ, प्रभाकर वाघ, सुनील वाघ आदी ग्रामस्थ उपस्थित होते
या ठिकाणी गटविकास अधिकारी संदीप जठार, कृषी अधिकारी भालेराव, बांधकाम उप अभियंता ढोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, यांनी या ठिकाणी भेट दिली आहे. यावर गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी सांगितले की प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन योग्य तो निर्णय घेतला जाईल
पडलेल्या भेगा सुरवातीला कमी होत्या आता त्या मोठ्या झाल्या आहेत आमच्यावर आलेली नैसर्गिक आपत्तीमुळे आमच्या 18 कुटुंबावर ही दुर्दैवी वेळ आली आहे. शासनाने आणि टाटाने आमचे पुनर्वसन करून आम्हला जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सरपंच अर्चना सुभाष वाघ यांनी केली आहे.