नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये एक दाम्पत्य घटस्फोट घेत आहे. मात्र या प्रकरणात पत्नीकडून केस दाखल करण्यात आली नाही तज पतीला आपल्या पत्नीसोबत राहायचे नाही. याचे कारणही जरा विचित्रच आहे. त्याची पत्नी आंघोळ करत नसल्याचे कारण पतीने दिले आहे.
अलीगढमधील वुमन प्रोटेक्शन सेलमध्ये हे प्रकरण पोहोचले आहे. आता काउन्सेलिंग करून दोघांनाही समजावले जात आहे. जेणेकरून आपसातील वाद दूर करून ते सोबत रहायला तयार व्हावे. पतीने काउन्सेलिंग दरम्यान पत्नीकडून घटस्फोट हवा असल्याची मागणी केली. त्यावेळी त्याने पत्नी आंघोळ करत नसल्याचे कारण सांगितले.
पतीने काउन्सेलरला सांगितले की, ‘मॅडम माझी पत्नी आंघोळ करत नाही. त्यामुळे मी तिच्यासोबत राहू शकत नाही. कुपया मला घटस्फोट द्यावा’. पतीची ही विनंती ऐकल्यावर काउन्सेलरही हैराण झाल्या. ही घटना अलीगढच्या चंडौस भागातील आहे. असे सांगितले जात आहे की, दोन वर्षाआधी या दाम्पत्याचे लग्न झाले होते. मुलगा चंडौसचा राहणार आहे तर मुलगी क्वार्सीची राहणारी आहे.
दोघांमध्ये लग्न झाल्यावर सुरूवातीला सगळं काही ठीक होतं. पण त्यानंतर दोघांमध्ये सतत वाद आणि भांडणं होऊ लागली होती. भांडणं इतके जास्त वाढले की, दोघेही एकमेकांच्या सवयीबाबत आणि राहणीमानाबाबत कमेंट करू लागले होते. यादरम्यान ९ महिन्याआधी दोघांना एक मुलगाही झाला. सर्वांना आशा होती की, मुलगा झाल्यावर दोघांमधील दूर होतील. पण तसं काहीही झालं नाही. वाद वाढले तेव्हा प्रकरण पोलीस आणि वुमन प्रोटेक्शन सेलकडे गेलं.
यावेळी काउन्सेलर यांन पती आणि पत्नी दोघांनाही समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. यादरम्यान पती, पत्नी आंघोळ करत नसल्याचं कारण देत घटस्फोटाची मागणी करू लागला होता. पती म्हणाला की, तो त्याच्या पत्नीमुळे या कारणाने हैराण आहे की, ती रोज आंघोळ करत नाही. तिच्या शरीराची दुर्गंधी येते. आता त्याच्या त्याच्या पत्नीसोबत रहायचं नाहीये. तर दुसरीकडे पत्नीने आरोप लावला की, तिच्यावर पती चुकीचे आरोप लावत आहे आणि तिला त्रास दिला जात आहे.