नेवासा : नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथे गोधन नॅचरल प्रॉडक्ट या नावाने सुरू करण्यात आलेल्या गायीच्या शेणा पासून तयार करण्यात येणाऱ्या कलरच्या युनिटचे उद्घाटन महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते व आमदार शंकरराव गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
शेतकऱ्यांनी या स्पर्धेच्या युगात उचललेलं व्यवसायासाठीचे हे पहिले यशस्वी पाऊल आहे असे आ शंकरराव गडाख यांनी भणगे कुटुंबीयांना शुभेच्छा देताना म्हटले त्याचबरोबर आ शंकरराव गडाख यांनी त्यांच्या आयुष्यातील एक अनुभव शेतकऱ्याशी संवाद साधताना म्हटले की कोणताही व्यवसाय करत असताना तो अभ्यासपूर्ण केला पाहिजे असा संदेश त्यांनी यावेळी उपस्थित शेतकरी यांना दिला. पुढे बोलताना त्यांनी असेही म्हटले की माझेही स्वप्न होते की गायीच्या शेणा पासून काहीतरी प्रोजेक्ट तयार केला पाहिजे तसा मी प्रयत्न केला.
परंतु त्यावेळी काही कारणास्तव हा प्रकल्प मला बनवता आला नाही व तो पूर्णही झाला नाही पण आज मला खूप आनंद होत आहे की माझ्याच नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथील माझ्या स्वप्नातल्या गाईच्या शेणांपासून तयार होणारा महाराष्ट्रातील पहिला कलरचा प्रोजेक्ट भणगे कुटुंबीयांनी उभा केला याचा मला सार्थ अभिमान वाटतो. पुढे बोलताना आ शंकरराव गडाख असे म्हणाले की गाईच्या शेणापासून काहीतरी निर्माण करायला पाहिजे या हेतूने मी गुजरातमध्ये गोरखपूर येथे प्रोजेक्ट बघण्यासाठी गेलो होतो.
त्यावेळी प्रोजेक्टवर काम करणाऱ्या मॅनेजमेंट टीमशी ही मी बोललो व सर्व माहिती समजावून घेतली व तेथे असणाऱ्या मॅनेजरला मी म्हणालो की जर मी हा प्रोजेक्ट उभा केला तर तुम्ही आमच्याकडे येऊ शकता का म्हणजेच मी त्याला आपल्या नेवासा तालुक्यात शेतकऱ्यांसाठी आणण्याचा प्रयत्न केला आणि तोही तयार झाला होता त्यानंतर मी या प्रोजेक्टची बांधणी सुरू केली परंतु काही कारणास्तव हा प्रोजेक्ट होऊ शकला नाही. आणि आज नेवासा तालुक्यात होत आहे.
एका शेतकरी कुटुंबाने तयार केलेला हा प्रोजेक्ट यशस्वी होईल व इतरही शेतकऱ्यांनी असे व्यवसायात उतरून आपली आर्थिक प्रगती करून संसाराचा गाडा यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवावा शेतीला जोड व्यवसायाची साथ असेल तर उत्कर्ष होतो यासाठी शेतकरी बांधवांनी प्रयत्न केला पाहिजे असे म्हणाले.गुरुवर्य महंत भास्कगिरीजी महाराज यांनीही या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज,दिगंबर बाबा आराध्य,माजी सभापती तुकाराम काळे,माजी उपसभापती किशोर जोजार,आबासाहेब भणगे, मुळा कारखाना संचालक बाबासाहेब भणगे,बाळासाहेब भणगे,सुर्यकांत गांधी, किशोर भणगे,व ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“गाईच्या शेणातून होणाऱ्या कलरमुळे जैविक रंग वापरात येईल व निर्सगाची हानी होणार नाही व पर्यावरण संवर्धनास हातभार लागेल.” –आमदार शंकरराव गडाख