नवी दिल्ली – आज केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2022 सादर केला यामध्ये काही सर्वसामान्यांच्या काही अपेक्षा पुर्ण झाल्या त्याचबरोबर शेतकरी, विद्यार्थी वर्गाला सुद्धा दिलासा दिला आहे. मात्र अर्थसंकल्पात सर्व सामान्य वर्गासाठी काही चांगल्या तर नोकरदारांच्या पदरी आयकरामध्ये बदल न झाल्याने निराशा आली आहे. या अर्थसंकल्पामध्ये काही वस्तू सामान्यांसाठी स्वस्त झाल्या आहेत.
आजच्या अर्थसंकल्पामध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन ऐवजी बॅटरी स्वॅपिंग धोरण राबवणार असल्याच सांगितलं तसंच येत्या काही वर्षात जवळपास ८० लाख नोकऱ्या निर्माण करण्याच सरकारच उद्दीष्ट असल्याचंही अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान आजच्या अर्थसंकल्पामध्ये घरगुती क्षेत्रातील लोकांना लाभ मिळावा यासाठी कापड आणि चामड्याच्या वस्तूही स्वस्त होणार आहेत त्यामुळे साहजिकच कपडे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरांमध्ये भेटतील ही अपेक्षा आहे.