नवी दिल्ली – केंब्रिज विद्यापीठात दिलेल्या भाषणावरून काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आहेत. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांच्यावर पुन्हा हल्ला चढवला आहे. किरेन रिजिजू म्हणाले, ‘राहुल गांधी भारताच्या एकतेसाठी अत्यंत धोकादायक आहेत’, अशी जहरी टीका केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले की, स्वयंघोषित काँग्रेसच्या राजपुत्राने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तो खरच पप्पू आहे हे परदेशी लोकांना माहीत नाही असेही ते म्हणाले.
रिजिजू यांनी ट्विट केले की, “भारतातील लोकांना माहित आहे की, राहुल गांधी पप्पू आहेत, पण परदेशी लोकांना ते खरे पप्पू आहेत हे माहित नाही. त्यांच्या मूर्ख विधानांवर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, पण समस्या ही आहे की त्यांच्या भारतविरोधी विधानांचा भारतविरोधी शक्ती भारताची प्रतिमा खराब करण्यासाठी गैरवापर करतात.
केंब्रिज विद्यापीठात राहुल गांधींच्या भाषणाचा व्हिडिओ ट्विट करताना त्यांनी हा हल्ला केला आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र यांच्यावर भारताची वास्तू नष्ट केल्याचा आरोप केला होता. त्याचवेळी रिजिजू म्हणाले की पीएम मोदींचा एकमेव मंत्र ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ आहे.