चिंबळी –संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 725वा समाधी सोहळा व कार्तिक वारीसाठी राहुरी तालुक्यातील तांदूळनेर येथून निघालेल्या दिंडी सोहळ्यातील वारकरी भाविकांचे चिंबळी, केळगाव, आळंदी रस्त्यावर ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
शांती आश्रम तांदूळनेर रामचंद्र महाराज वामन यांच्या प्रेरणेने श्रीक्षेत्र शांती आश्रम तांदूळ नेकर ते आळंदी पायी दिंडी सोहळा गेल्या 38 वर्षांपासून पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन नामदेव महाराज वामन यांच्या प्रेरणेने दिंडी सोहळ्याचे चालक चांगदेव चव्हाण, आबा झगडे यांच्या वतीने करीत आहेत.
दोन वर्षांपासून करोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे हा दिंडी सोहळा केला नसल्याने यावर्षी मात्र 70वारकरी भाविकांना सामिल करून ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषात टाळमृदंगाच्या गजरात चालत आलेल्या या पायी दिंडी सोहळ्याचे स्वागत चिंबळी प्रगतिशील शेतकरी हनुमंत बनकर यांच्या वतीने केले. या वेळी वारकरी भाविकांनी बनकर यांच्या निवासस्थानी संगीत भजनांचा कार्यक्रम आयोजित केला होता.