मुंबई – मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जालन्यातील ओबीसी एल्गार सभेमध्ये (Obc Elgar sabha jalana) मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांनी छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी केली.आता भुजबळांनी संभाजीराजे यांना जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. मला आमदारकी आणि मंत्री पदाची काळजी नाही असं भुजबळांनी इगतपुरी येथील सभेत बोलताना म्हंटले आहे.
“मी संभाजीराजे छत्रपती यांचा सन्मान करतो. कारण, आमच्या हृदयात मागासवर्गीयांसाठी लढणारे राजर्षी शाहू महाराज आहेत. शाहू महाराजांच्या गादीवर तुम्ही बसले आहात. तुम्ही कुठल्याही एका समाजाचे नाहीत, तर सर्वांचे आहात. मग, तुम्ही एका समाजाची बाजू घेऊन कसं काय बोलू शकता?” असा सवाल भुजबळांनी इगतपुरी (Chhagan bhujbal igatpuri sabha) येथील सभेत बोलताना उपस्थित केला. (Chhatrapati Sambhajiraje vs chhagan bhujbal)
भुजबळ पुढे म्हणाले,”तुम्ही राज्याचे महाराज आहात. त्यामुळे सगळ्यांना न्याय द्या. अन्याय होणार नाही, याची काळजी घ्या. आरक्षणाच्या प्रकरणात तुम्ही पडायला नको होतं. सर्वांचे अधिकार शाबूत ठेवून कुणावरही अन्याय करू नये, ही अपेक्षा संभाजी महाराजांकडून आहे. बीडमध्ये झालेलं नुकसान तुम्ही पाहायला जायला पाहिजे होत. मला आमदारकी आणि मंत्रीपदाची काळजी नाही” असं देखील भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केलं.
काय म्हणाले होते संभाजीराजे नेमकं ?
स्वतःचे राजकीय स्थान टिकवण्यासाठी भुजबळ हे दोन समाजांत भांडणं लावण्याचे पाप करत आहेत असा आरोप छत्रपती संभाजीराजे यांनी भुजबळांच्या भूमिकेवर केला. ”छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत.”असं संभाजीराजे म्हणाले.
“सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का ? हे स्पष्ट करावे अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी” अशी देखील संभाजीराजे यांनी मागणी केली आहे.