रामचंद्र सोनवणे,राजगुरूनगर, दि. १६ (प्रतिनिधी): खेड तालुक्यातील चास कमान धरण ९१ टक्के भरले असून भीमाशंकर परिसरात पडणाऱ्या जोरदार पावसामुळे धरणाचे ५ दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून सुमारे ५ हजार क्यूसेस वेगाने पाणी भीमा नदीत सोडले जात आहे. पावसाच्या प्रमाणावर धरणातून विसर्ग वाढवण्यात येणार असून नदी पात्रात कोणीही उतरू नये असे आवाहन शाखा अभियंता उत्तम राऊत यांनी केले आहे.
खेड तालुक्यातील चास कमान धरण ९१ टक्के भरले. आज (दि.१६) सकाळी १० वाजता धरणाचे पाचही दरवाजे २५ सेंटिमीटरने वर उचलून त्यातून ४२९५ क्यूसेस वेगाने भिमानदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. धरणाच्या विद्युत निर्मिती केंद्रातून ७५० क्यूसेस पाणी सोडले जात आहे असे एकूण पाच हजार क्यूसेस वेगाने पाणी सोडले जात आहे
भोरगिरी – भीमाशंकर परिसरात पावसाचे प्रमाण जास्त आहे. धारणात पाण्याची आवक वाढत असल्याने धरणातून सांडव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे. भीमा नदी काठाच्या नागरिकांनी पाण्यात उतरू नये. असा सतर्कतेचा इशारा धरण प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
चास कमान धरणातील पाणीसाठा टक्केवारी पुढील प्रमाणे
एकूण पाणी पातळी ६४८.४५ दशलक्ष घनमीटर,
एकूण साठा २२२.३८ दशलक्ष घनमीटर
उपयुक्त पाणीसाठा १९५.१९ दशलक्ष घनमीटर
टक्केवारी ९१ %
आज पर्यंत धरण क्षेत्रात झालेला पाऊस- ५१८ मिलिमीटर.