नवी दिल्ली – भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सोमवारी सांगितले की, चांद्रयान-3 चांगल्या स्थितीत आहे आणि त्याचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे कक्षा निश्चित करण्याची प्रक्रिया असेल, जेव्हा अंतराळ यान 100 किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत चंद्राच्या जवळ जाण्यास सुरुवात करेल.
मार्क-3 रॉकेटवर 14 जुलै रोजी प्रक्षेपित केलेले चांद्रयान-3 अंतराळयान आता चंद्राच्या 4,313 किलोमीटर लंबवर्तुळाकार कक्षेत आहे. सदर यानाची स्थानांतरित करण्यासाठी प्रक्रियांची मालिका 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे. त्यासाठी 100 किमीची वर्तुळाकार कक्षा सिमित करणे आवश्यक आहे.
विक्रम लॅंडर 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे, असे सोमनाथ यांनी सांगितले. आम्हाला कोणतीही अडचण दिसत नाही. समस्या फक्त पृथ्वीवरून लॅंडरच्या स्थितीचा अंदाज लावण्यात आहे. हे मोजमाप अतिशय महत्त्वाचे मोजमाप आहे, त्याला आपण कक्षा ठरवण्याची प्रक्रिया म्हणू शकतो. ती योग्य असल्यास उर्वरित प्रक्रिया पूर्ण करता येईल.
इस्रोचे अध्यक्ष म्हणाले, आम्ही यावेळी चांद्रयान-3 अगदी अचूकपणे कक्षेत उतरवण्यात यशस्वी झालो आहोत. योजनेनुसार थोडासा बदल करण्यात येत आहेत. तरिही त्याचे उत्कृष्ट परिणाम मिळत आहेत. आम्हाला आशा आहे की सर्व काही ठीक होईल. याआधी चांद्रयान-2 मधून मिळालेला अनुभव खूप उपयुक्त ठरत आहे कारण अंतराळ संस्थेने चंद्रावर अंतराळ यान उतरवण्याचा प्रयत्न केला. 2019 मध्ये, ही मोहीम अंशतः यशस्वी झाली होती.