मुंबई – भाजपचा महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा त्यांच्या पक्षाचा राजकीय कार्यक्रम आहे का असा प्रश्न पडतो. आता जर राज्यपालांना हवटले गेले नाही तर या महाराष्ट्रद्रोह्यांचा विरोध करण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे. वेळ आली तर महाराष्ट्र बंद पाडू, शांततापूर्ण मार्गाने महाराष्ट्र बंद करू. महाराष्ट्र हा लेचापेच्यांचा नाही हे केंद्राला दाखवून देऊ. अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे.
यावर आता भाजप नेत्यांकडून प्रतिउत्तर देण्यात येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यपाल कोश्यारी यांची बाजू घेत दावा केला आहे की, शिवाजी महाराजांचा अवमानच केला नाही. ते पुढे म्हणाले,’सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे होते. त्यांनी आता काही बोलणे म्हणजे विनोद केल्यासारखे आहे. राज्यपालांबद्दल उद्धव ठाकरे यांनी असं बोलणे योग्य नाही. राज्यपालांवर अशा पद्धतीने कोणी टीका करत नाही. त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे कोणीही समर्थन करत नाही. पण राज्यपालांची वृद्धावस्था काढली जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी हीच संस्कृती शिकवली का?’ असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.