मुंबई – यंदाच्या १९ व्या आशियाई खेळांच्या स्पर्धा चीनमधील ‘हांगझू’ येथे पार पडणार आहे. या क्रीडा स्पर्धांमध्ये क्रिकेट खेळाचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय महिला-पुरुष क्रिकेट संघ हा यंदाच्या आशियाई स्पर्धांमध्ये सहभागी होईल असे चाहत्यांना वाटत होते. मात्र आता भारतीय महिला-पुरुष क्रिकेट संघ या स्पर्धेत सहभागी होणार नसल्याचा निर्णय बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे चाहत्यांचा चांगलाच हिरमोड झाल्याचा दिसून येत आहे.
या निर्णयामागचे कारण काय?
”भारतीय पुरूष आणि महिला संघाचे संपूर्ण वर्षाचे वेळापत्रक आधीच ठरलेले असते. त्यामुळे महिला-पुरुष हे दोन्ही संघ दौऱ्यांवर असणार आहेत. त्यामुळे भारतीय संघाला आशियाई गेम्समध्ये सहभागी होता येणार नाही” अश्या प्रकारचे स्पष्टीकरण बीसीसीआयकडून देण्यात आले आहे.