देशात नेत्रदानाचे प्रमाण कमी : दृष्टी गमावलेल्यांची संख्या 25 लाखांपर्यंत
पुणे – भारतीय संस्कृतीत “दान’ करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे; परंतु हेच दान अवयवरुपी करण्यास व्यक्ती तयार होत नाही. त्यामुळे देशात दरवर्षी अनेक रुग्ण अवयव न मिळाल्यामुळे मृत्युमुखी पडतात. “नेत्रदान’ हे सर्वश्रेष्ठ दान असून आपले एक दान समोरच्याला दृष्टी मिळवून देते; परंतु देशातील अंध व्यक्तींची संख्या पाहता, मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या तुलनेत खूपच कमी व्यक्ती नेत्रदान करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे नेत्रदानाबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे.
25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा साजरा केला जातो. लोकांचा जीव वाचविण्यासाठी “रक्तदान’, अंध लोकांना दृष्टी प्राप्त होण्यासाठी “नेत्रदान’, वैद्यकीय ज्ञानासाठी आणि संशोधनासाठी मरणोत्तर “देहदान’ एखाद्या गरजू व्यक्तीला “किडनी दान’ करणे ही संकल्पना देशात रुढ होत आहेत. जगातील 8 कोटी अंध व्यक्तींपैकी भारतात जवळपास 1/4 अंध व्यक्ती आहेत. विविध करणांमुळे दृष्टी गमावलेल्या संख्या देशात 25 लाखांहून अधिक आहे.
नेत्रदान म्हणजे काय?
मृत्यू पश्चात आपले डोळे काढून परिचित किंवा अपरिचित व्यक्तीला दृष्टी मिळावी यासाठी परवानगी देणे म्हणजेच नेत्रदान करणे. मरणोत्तर नेत्रदान करणाऱ्या व्यक्तींनी त्याबाबत आपले नातेवाईकांना सांगणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक ते अर्ज जवळच्या नेत्रपेढीत भरुन द्यावे. इच्छापत्र भरलेल्या रूग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी तत्काळ जवळच्या नेत्रपेढीला कळविणे आवश्यक आहे. वय वर्षे 1 ते 80 वर्षांपर्यंत नेत्रदान करता येते. मृत्युनंतर साधारण चार ते सहा तासात हे डोळे काढावे लागतात. मृत व्यक्ती जर जॉन्डीस (ळपषशलींर्ळीं हशरिींळींळशी) व्हायरल मोनंनजायटीस, कॅन्सर, डोळ्यास पूर्वी काही शस्त्रक्रिया झाली असेल तरच नेत्रदान करता येते. पण एड्स, बुडून मृत्यू होणे, फाशी घेतलेल्या व्यक्तीचे नेत्रदान स्वीकारता येत नाही.
जगात सर्वांत जास्त अंध व्यक्ती भारतात आहेत. अंधश्रद्धा आणि अज्ञानामुळे देशात नेत्रदानाचे प्रमाण कमी आहे. तसेच नेत्रदानाच्या चळवळीत मानकन्हैया नेत्रपेढी यासह विविध संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि वैद्यकीय व्यवसायिकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
– डॉ. वर्धमान कांकरिया, सहसचिव महाराष्ट्र नेत्रतज्ज्ञ संघटना