मंचर -अवसरी खुर्द गावातील संपूर्ण व्यवसाय सोमवार आणि मंगळवार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. गावात 700 ते 800 नागरिक पुणे, मुंबई व इतर ठिकाणांहून आले असून, त्यांच्या हालचालींवर ग्रामपंचायतीचे लक्ष असल्याची माहिती सरपंच संगीता शिंदे यांनी दिली.
ग्रामविकास अधिकारी आर. टी. गाढवे यांनी उपाययोजनांची माहिती दिली. बाहेरगावाहून आलेले नागरिक, स्थानिक नागरिक, कुटुंब प्रमुखाचे नाव, 60 वर्षांवरील व्यक्तींची नावे, मधुमेह,रक्तदाब व विविध आजार असणाऱ्या व्यक्तींची माहिती, सर्दी-खोकला असलेल्यांची नावे याबाबत घरी जाऊन प्रशासकीय अधिकारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, पोलीस पाटील, कृषिसेवक यांनी भेटी देऊन, सर्व्हे करून माहिती संकलित केली आहे.