जालना – राज्यात महिला अत्याचारांच्या घटानांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रोज महिलांवरील अत्याचाऱ्यांच्या बातमा समोर येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र महिला सुरक्षित आहेत की नाही अशा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. असे असताना जालना शहरातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शाळेतून पळवून नेऊन तिच्यावर नराधमाने अत्याचार केले आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
अजय गायकवाड, रा. पैठण असे नराधाम आरोपीचे नाव आहे. पैठण पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. व अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला आहे. आरोपी अजयने शाळेत येऊन पीडित मुलीला आपण तिचे नातेवाईक असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पीडित मुलीला सोबत घेऊन गेला. पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले.
दरम्यान, शाळेत गेलेली मुलगी बराच वेळ झाला तरी घरी परतली नसल्यामुळे कुटुंबीयांनी सगळीकडे तिचा शोधाशोध सुरू केली. रात्री उशिरा मुलगी घरी आली व तीने घडलेला प्रकार सांगितला. या घटनेमुळे कुटुंबीयांना मोठा हादरा बसला. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांना तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये गाठले पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी केली असता बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. पुढील तपास पोलीस करत आहेत.