कोलंबो :- भारत-पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी संघ आशिया करंडकाच्या आर.प्रेमदासा स्टेडिअमवर होणाऱ्या सुपर-4 सामन्यात पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. या सामन्यावरही पावसाचं सावट आहे. मात्र, त्यासाठी उद्याचा राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. या दोघांमधील साखळी गटातील सामना अनिर्णित राहिला होता. आज पाऊस न पडल्यास दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होऊ शकते.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकने शनिवारीच प्लेइंग-11 ची घोषणा केली होती. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
तर कर्णधार रोहितने प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले आहेत. जसप्रीत बुमराहचे संघात पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर श्रेयस अय्यरच्या जागी केएल राहुलचा समावेश करण्यात आला आहे.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11 खालीलप्रमाणे –
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
पाकिस्तानः बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, आगा सलमान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फहीम अश्रफ, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ.