Owaisi In Telangana : तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सर्वच राजकीय पक्ष एकमेकांच्या विरोधात प्रचार करताना दिसून येत आहेत. त्यातच AIMIM नेते असदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. यावेळी बोलताना ,”जे लग्न करत नाहीत ते आपला राग इतरांवर काढतात, असे त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही अप्रत्यक्षरीत्या हल्लाबोल केला आहे.
असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखालील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) ने तेलंगणात केवळ नऊ जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, काँग्रेस आणि एआयएमआयएममध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. हैदराबादमध्ये एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना ओवैसी यांनी लग्न न केल्याबद्दल राहुल गांधींवर वैयक्तिक निशाणा साधला. नाव न घेता ओवैसी म्हणाले की, या जगात कधीही अविवाहित राहू नये, कारण जो अविवाहित राहतो तो आपला राग इतरांवर काढत असतो.” असे म्हणत त्यांनी राहुल गांधी यांना टोला लगावला.
पुढे बोलताना ओवैसी यांनी, “आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जगात कधीही एकटे राहू नका. घरात नेहमी कोणीतरी असावं आणि ज्यांना कोणी नसतं, त्यांची निराशा इतरांवर येत राहते. देशात एक जोडी आहे ( राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी) ज्यांच्या घरी कोणीही नाही आणि दोघांनीही आपली निराशा आणि एकटेपणा इतरांवर टाकला आहे, म्हणूनच ते माझ्या मागे लागले आहेत.” असे म्हणताच सभेतुन जोरदार टाळ्या आणि घोषणाबाजी झाली.
ओवैसी यांनी काँग्रेसचे तेलंगणा प्रमुख रेवंत रेड्डी यांच्यावरही निशाणा साधत रेड्डी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) संबंध असल्याचा आरोप केला. हैदराबादच्या भेटीदरम्यान एआयएमआयएम खासदार म्हणाले, “त्याचे (रेवंत रेड्डी) नाव आरएसएस अण्णा आहे, त्यांनी आरएसएसमधून आयुष्य सुरू केले. ते आरएसएस सोडणार नाहीत. आज हैदराबादमधील काँग्रेसचे मुख्यालय त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मोहन भागवत (आरएसएस प्रमुख). 130 जागांच्या तेलंगणा विधानसभेसाठी 30 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.