मुंबई – महाराष्ट्राला गतिमान आणि प्रगतशील बनवण्यासाठी हिंदुह्रयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. परंतु आता याच समृद्धी महामार्गाची अपघातांचा महामार्ग म्हणून ओळख होऊ लागली आहे.
समृद्धी महामार्ग सुरू होऊन सुमारे दीडशे दिवस झाले आहेत. या 150 दिवसात या महामार्गावर जवळपास 950 हून अधिक अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. तर जवळपास 40 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
दरम्यान, याप्रकरणाची महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने दखल घेतली असून उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसह तज्ज्ञांनी अपघात स्थळांची पाहणी केली आहे. तसेच या बाबतचा अहवाल MSRDC सादर करणार आहे. तसेच अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी नवीन मार्ग काढले जाणार आहे अशी माहिती महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.