नवी दिल्ली – राजस्थानातील मतदानाच्या दिवशी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मतदारांना सोशलमिडीया पोस्टद्वारे कॉंग्रेसच्या (Congress) गॅरंटीसाठी मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यावर भाजपने (Bjp) आक्षेप घेतला असून हा आचार संहितेचा भंग असल्याचा आरोप करीत त्यानी निवडणूक आयोगाकडे (Election Commision) राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राहुल गांधींचे सोशल मिडीया अकाउंट निलंबीत करण्याची मागणीही भाजपने केली आहे.भाजपने निवडणूक आयोगाला लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे की मतदानाच्या आधी ४८ तास प्रचार बंद ठेवला जातो. त्या नियमांचा राहुल गांधी यांनी भंग केला आहे. (Congress vs bjp)
भाजपने म्हटले आहे की निवडणूक आयोगाने राजस्थानचे मुख्य निवडणूक अधिकारी, यांना राहुल गांधींच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्याचे आणि त्यांच्या विरोधात फौजदारी खटला सुरू करण्याचे निर्देश दिले पाहिजेत.
राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील निवडणूक प्रचारसभांमध्ये नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘पनवती’ असा उल्लेख केला होता. त्यानंतर त्यांच्यावर भाजपकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजपने राहुल यांच्या विरोधात निवडणूक आयोगात धाव घेतली आहे.