एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा वाढला
महामंडळ अवमान याचिका दाखल करणार
मुंबई -एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे यासाठी मागील तीन दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आज संपाविरोधातील याचिकेवर हायकोर्टात सुनावणी झाली. एसटी महामंडळाने संपकऱ्यांविरोधात अवमान याचिका सादर केली आहे. शुक्रवारपर्यंत कामगार संघटनांना अवमान याचिकेवर उत्तर सादर करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहेत. दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.
दरम्यान, आणखी 542 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. त्यामुळे निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या 918 वर पोहचली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बुधवारी सुरू असलेल्या बेकायदेशीर संपात सहभागी झाल्याबद्दल राज्यभरातील आणखी 542 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे, अशी माहिती
मंत्रालयाची सुरक्षा वाढवण्यात आली
एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे यासाठी आमदार गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रालयासमोर मोर्चा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. या पार्श्वभूमीवर मंत्रालय परिसरात मोठ्या संख्येने पोलीस तैनात करत सुरक्षाही वाढवण्यात आली. याशिवाय कुठल्याही प्रकारे मंत्रालयासमोर आंदोलन होऊ नये किंवा आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा मंत्रालयाबाहेर लावण्यात आला आहे.