Manipur Violence Updates : ईशान्येकडील राज्य मणिपूरमध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे, या हिंसाचारामुळे आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. लाखो लोकांचे जनजीवन हिंसेत विस्कळीत झाले आहे. अशात माणुसकीला काळीमा फासणारी घटना मणिपूरमध्ये घडली आहे.
In a press statement, the Superintendent of Police K Meghachandra Singh has responded to an alleged viral video from Manipur. He said “As regard to the video of 2 women paraded naked by unknown miscreants on 4th May 2023, a case of abduction, gangrape and murder was registered at… pic.twitter.com/S4uI7ACXbT
— ANI (@ANI) July 19, 2023
मिळालेल्या माहितीनुसार, येथे जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. दोन महिलांची नग्न धिंड काढत सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार मणिपूरमधील थौबाल जिल्ह्यात घडली आहे.
मणिपूरमधील लज्जास्पद घटनेच्या मुद्यावरून विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर विरोधकांनी यापूर्वी अनेकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. अशात महिलांवरील हिंसाचाराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. काँग्रेस, आप आणि टीएमसीसह विविध राजकीय पक्षांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. यासोबतच मोदी सरकारवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दुसरीकडे केंद्र सरकारही या मुद्द्यावर संसदेत चर्चेसाठी तयार आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही या घटनेला पूर्णपणे अमानवीय ठरवले असून मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्याशी याबद्दल बोलले आहे. याप्रकरणी कठोर कारवाई करून दोषींवर कारवाई करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की,’या ईशान्येकडील राज्यात भारताच्या संकल्पनेवर हल्ला होत असताना विरोधी पक्षांची ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स’ (इंडिया) गप्प बसणार नाही. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. समाजातील हिंसाचाराचा सर्वाधिक फटका महिला आणि मुलांना सहन करावा लागत असल्याचे म्हटले आहे.
मणिपूरमधील हिंसक घटनांवर केंद्र सरकार, मोदीजी तुम्ही इतक्या शांतपणे कसे काय सोपी शकता ? तुम्ही डोळे बंद करून का बसले आहेत, असा सवाल त्यांनी सरकारला केला. अशी हिंसक घटना त्यांना अस्वस्थ करत नाहीत का? असा सवाल आता विरोधकांकडून केला जात आहे.