पिंपरी – राज्याच्या अन्नधान्य पुरवठा विभागाने रेशन दुकानांना आयएसओ मानांकन देण्यासाठीचा निर्णय घेतला आहे. राज्यातील रेशन दुकानदारांनी स्वयंप्रेरणेतून स्वतःच्या दुकानात ग्राहकांना उत्तम दर्जाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. त्या अनुषंगाने आवश्यक त्या सुधारणा कराव्यात. अधिकाऱ्यांनी ग्राहक आणि दुकानदार यांच्यातील दुवा बनून काम करावे. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत रसद विनातक्रार पोहोचवावी. राज्य सरकार सर्व ते सहकार्य करील, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
रेशन दुकानांना आयएसओ मानांकन मिळावे, रेशन दुकानदारांकडे पाहण्याचा ग्राहकांचा दृष्टिकोन बदलावा, यासाठी पुरवठा विभागाचे उपायुक्त डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात योजना राबविण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवार (दि. 29) रोजी राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी रामटेक बंगल्यावर भुजबळ
8094 रेशन दुकानांना प्रमाणपत्र
उप आयुक्त (पुरवठा) पुणे यांचे कार्यालय, 5 जिल्हा पुरवठा कार्यालये, 2 अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालये, 60 तहसिल कार्यालये, 15 परिमंडळ कार्यालये व 80 गोदामे असून या सर्व 163 कार्यालये व गोदामांना आय. एस. ओ 9001-2015, आय. एस. ओ. 28000-2007 हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. तसेच 9164 रास्तभाव दुकानांपैकी 7931 रास्तभाव दुकानांना आय. एस. ओ. 9001-2015 हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. म्हणजेच सर्व कार्यालये व रास्तभाव दुकान यांना एकूण 8094 प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. रेशन दुकानांमध्ये स्वच्छता, ग्राहकांना चांगल्या दर्जाचे धान्य, आकर्षक मांडणी, वेळेवर धान्य वितरण, कोणत्या योजनेंतर्गत किती धान्य प्राप्त झाले याची माहिती रेशन दुकानांमध्ये फलकावर उपलब्ध होणार असल्याचे पुरवठा विभागाचे उपायुक्त डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी सांगितले.