सातारा -महाराष्ट्रात करोना आणि ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. बाधितांची संख्या अशीच वाढत राहिली तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आम्हाला कडक निर्बंध लादावे लागतील. या निर्बधांची अंमलबजावणी संबंधित यंत्रणा आणि तुम्हा आम्हालाच करावी लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयाच्या नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा अजित पवार यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले,
उपाध्यक्ष प्रदीप विधाते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष समिंद्रा जाधव, शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, महिला व बालविकास समिती सभापती सोनाली पोळ, माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील
सत्यजितसिंह पाटणकर, प्रभाकर देशमुख, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर, बाळासाहेब सोळस्कर, सुरेंद्र गुदगे, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या सरचिटणीस सौ. संगीता साळुंखे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ. समिंद्रा जाधव, राजेश पाटील- वाठारकर, ऍड. राजाभाऊ उंडाळकर, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष शाफिक शेख, स्मिता देशमुख, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील आदी उपस्थित होते.
पश्चिम बंगालमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढायला लागल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लॉकडाऊन केला आहे. देशातील काही राज्यांत असे निर्बंध घातले आहेत. काही ठिकाणी रात्रीचे लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे आपल्याकडेसुद्धा कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. करोना, लॉकडाऊन, ओबीसी आरक्षण, इम्पिरिकल डेटा यावर अजित पवार यांनी भाष्य केले.