नगर – राज्यात कंत्राटी भरतीचा निर्णय तत्कालीन कॉंग्रेस – राष्ट्रवादी सरकारने आणि त्या नंतर महाविकास आघाडी सरकारने घेऊन राज्यातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे महापाप केल्याचा आरोप करत भाजपच्या वतीने शनिवारी (दि. 21) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत निषेध नोंदवला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, कंत्राटी भरतीचे संपूर्ण पाप हे (उबाठा), कॉंग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहे. आंदोलन करताना यांना लाज वाटली पाहिजे. हे 100 टक्के त्यांचे पाप आहे. सन 2010 मध्ये कॉंग्रेसचे अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना 6 हजार कंत्राटी पदांचा शासन निर्णय काढला होता.