कोपरगाव – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधूता व न्याय या चार तत्त्वांवर आधारित जगात आदर्श असे भारतीय संविधान लिहून आधुनिक भारताच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत देशासाठी आणि दीन-दलित, वंचित, शोषित व उपेक्षित लोकांच्या कल्याणासाठी कार्य केले. डॉ. आंबेडकर यांचा मानवतेचा विचार पुढे नेणे ही आज काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
बुद्धिस्ट यंग फोरम (फोर्स) ने शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या साईबाबा ब्लड बँकेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास कोल्हे यांनी भेट देऊन स्वत: रक्तदान केले. याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले, कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब नरोडे, माजी नगराध्यक्ष दिलीपराव दारुणकर, राजेंद्र सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र पाठक, स्वप्नील निखाडे, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, रिपाइंचे प्रदेश सचिव दीपक गायकवाड, माजी नगरसेवक बबलू वाणी, जितेंद्र रणशूर, संजय जगदाळे, दिनेश कांबळे,
रवींद्र रोहमारे, संजीवनी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदीप नवले, टाकळीचे सरपंच संदीप देवकर, ‘अमृत संजीवनी’ चे संचालक गोपीनाथ गायकवाड, सुशांत खैरे, सोमनाथ म्हस्के, सुजल चंदनशिव, सतीश चव्हाण, जयप्रकाश आव्हाड, अंकुश जोशी, रुपेश सिनगर, फकिरा चंदनशिव, संतोष नेरे, महेश गोसावी, नंदू केकाण, शाहरुख शेख, रोहण दरपेल, श्याम आहेर आदींसह भाजप, भाजयुमोचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.