काळाची पावलं ओळखत आपल्या कार्यपद्धतीत वेळोवळी सुधारणा करत बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीनं शेतकऱ्यांसाठी अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शेतकर्यांचं हित सर्वश्रेष्ठ ही दृष्टी ठेवून समितीचा कारभार जोमानं सुरू आहे. दैनिक प्रभातच्या वर्धापनदिनानिमित्त बाजार समितीच्या वाटचालीबद्दल साधलेला संवाद…
शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं काळाची पावलं ओळखून अत्याधुनिक सोयी-सुविधा देणाऱ्या बारामतीच्या कृषी उत्पन्न बाजारसमितीनं आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सभापती शौकत कोतवाल आणि सचिव अरविंद जगताप यांच्या नेतृत्वाखाली ही समिती आपलं कार्यक्षेत्र दिवसेंदिवस विस्तारत आहे. गेल्या वर्षभरात बाजार समितीनं शेतकर्यांसाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यातल्या ठळक बाबी सांगायच्या तर समितीनं 28 व्यापारी गाळे बांधलेले आहेत. बारामतीत बाजार समितीचा पेट्रोलपंप कार्यान्वित झाला आहे. पुढच्या वर्षी सुपे बाजारात आणखी एक पेट्रोलपंप सुरू करण्याचे नियोजन आहे. शेतकऱ्याचा माल साठविता यावा यासाठी एक हजार मेट्रिक टन क्षमतेचं गोडाऊन बांधलं आहे. शेतीमालाचे भाव पडलेले असतात तेव्हा माल विकल्यास शेतकऱ्यांऐवजी विकत घेणार्यालाच फायदा होतो. हे टाळण्यासाठी आणि शेतीमाल खराब होऊ नये यासाठी ही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसंच शेतीमाल तारण ठेवून त्याबदल्यात शेतकर्यांना 6 टक्के व्याजदरानं कर्ज देतो. या योजनेचा फायदाही अनेकजण घेत आहेत.
बाजार समितीत गहू, ज्वारी, बाजरी, मका यांची चांगली आवक असते, हे लक्षात घेऊन अत्याधुनिक यांत्रिक चाळणी यंत्राची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळं शेतकर्याला 50 ते 100 रुपये क्विंटलमागे जास्त मिळत आहेत. सुमारे 25 लाख रुपये खर्च करून ही यंत्रणा विकसित केली आहे. त्याचा लाभ सर्वच शेतकर्यांना होत आहे.
याला जोडूनच क्लिनिंग आणि ग्रेडिंग करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसविल्यामुळे अवघ्या पाच सेकंदात धान्याचे ग्रेड ठरविले जाते. त्यामुळे त्याचा वेळ वाचतो. व्यापार्याकडे त्याचा माल क्लिन होऊन जातो. या अशा विविध सुविधांचा शेतकरी लाभ घेत असल्याचे जगताप यांनी सांगितले.
काळाची पावलं ओळखत आपल्या कार्यपद्धतीत वेळोवळी सुधारणा करत बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीनं शेतकऱ्यांसाठी अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शेतकर्यांचं हित सर्वश्रेष्ठ ही दृष्टी ठेवून समितीचा कारभार जोमानं सुरू आहे. दैनिक प्रभातच्या वर्धापनदिनानिमित्त बाजार समितीच्या वाटचालीबद्दल साधलेला संवाद…
शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं काळाची पावलं ओळखून अत्याधुनिक सोयी-सुविधा देणाऱ्या बारामतीच्या कृषी उत्पन्न बाजारसमितीनं आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सभापती शौकत कोतवाल आणि सचिव अरविंद जगताप यांच्या नेतृत्वाखाली ही समिती आपलं कार्यक्षेत्र दिवसेंदिवस विस्तारत आहे. गेल्या वर्षभरात बाजार समितीनं शेतकर्यांसाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यातल्या ठळक बाबी सांगायच्या तर समितीनं 28 व्यापारी गाळे बांधलेले आहेत. बारामतीत बाजार समितीचा पेट्रोलपंप कार्यान्वित झाला आहे. पुढच्या वर्षी सुपे बाजारात आणखी एक पेट्रोलपंप सुरू करण्याचे नियोजन आहे. शेतकऱ्याचा माल साठविता यावा यासाठी एक हजार मेट्रिक टन क्षमतेचं गोडाऊन बांधलं आहे. शेतीमालाचे भाव पडलेले असतात तेव्हा माल विकल्यास शेतकऱ्यांऐवजी विकत घेणार्यालाच फायदा होतो. हे टाळण्यासाठी आणि शेतीमाल खराब होऊ नये यासाठी ही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसंच शेतीमाल तारण ठेवून त्याबदल्यात शेतकर्यांना 6 टक्के व्याजदरानं कर्ज देतो. या योजनेचा फायदाही अनेकजण घेत आहेत.
बाजार समितीत गहू, ज्वारी, बाजरी, मका यांची चांगली आवक असते, हे लक्षात घेऊन अत्याधुनिक यांत्रिक चाळणी यंत्राची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळं शेतकर्याला 50 ते 100 रुपये क्विंटलमागे जास्त मिळत आहेत. सुमारे 25 लाख रुपये खर्च करून ही यंत्रणा विकसित केली आहे. त्याचा लाभ सर्वच शेतकर्यांना होत आहे.
याला जोडूनच क्लिनिंग आणि ग्रेडिंग करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसविल्यामुळे अवघ्या पाच सेकंदात धान्याचे ग्रेड ठरविले जाते. त्यामुळे त्याचा वेळ वाचतो. व्यापार्याकडे त्याचा माल क्लिन होऊन जातो. या अशा विविध सुविधांचा शेतकरी लाभ घेत असल्याचे जगताप यांनी सांगितले.
इतिहास
- 16 डिसेंबर 1935 रोजी कॉटन मार्केट म्हणून बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना
- आधी कापसाचीच विक्री; 1955 पासून ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, तूर, करडई, कांदे आणि भूईमूग इत्यादी
- शेतमालाची विक्री
- 1973 नंतर मूग, उडीद, मका, हुलगा, बटाटे, चिंच, आंबे, केळे, द्राक्ष, डाळिंब यासह फळभाज्या आणि पालेभाज्यांचा समावेश
- 2008 पासून साखर, सर्वप्रकारची तेले, मासळी, मसाल्याचे पदार्थ यांचा समावेश
पजळोची इथल्या उपबाजार समितीत शेळी, मेंढी जनावरांचीही विक्री
पूर्णतः डिजिटल
शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा मोबदला लगेचच देता यावा यासाठी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीनं स्वतःची डिजिटल यंत्रणा विकसित केलेली आहे. ऑनलाइन पद्धतीनं पैसे जमा झाले की, शेतकऱ्याच्या मोबाइलवर लगेचच मेसेज येतो. ज्या दिवशी व्यवहार होतो, त्याच दिवशी तो पूर्ण करण्याच्या दृष्टीनं ही यंत्रणा विकसित केलेली आहे. सगळे वजनकाटे हे इलेक्ट्रॉनिक आहेत. डिजिटायझेशनमुळं पारदर्शी व्यवहार हे सूत्र जपलं जात आहे. डिजिटल व्यवहारास प्राधान्य देण्यास येथे प्राधान्य दिले जाते.
लवकरच शिवभोजन केंद्र…
शेतकऱ्यांना स्वस्तात जेवण मिळावं यासाठी बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या दहा रुपयांत शिवभोजन या योजनेचं एक केंद्र समिती परिसरात सुरू करावे, अशी मागणी करण्यात येणार आहे. या ठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांसह शेतमाला वाहणारे मजूर यासह धनधान्य निवडणारे अशा घटकांना अल्पदरात आणि पोषक आहार उपलब्ध व्हावा याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून शिवभोजन योजनेद्वारे हा प्रयत्न केला जाणार असून हा उपक्रम स्तुत्य ठरणार आहे.
लिलावासाठी संगणकीय प्रणाली
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतीमालाच्या लिलावासाठी प्रायोगिक तत्त्वावर संगणकीय प्रणाली उभी केलेली आहे. या प्रणालीमुळं पुण्यातला व्यापारीही बारामतीचा माल खरेदी करू शकेल. सध्या, तरी ही प्रणाली बाजार समितीपुरती कार्यान्वित करण्यात आली असून त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता तिचा विस्तार करण्यात येणार आहे. डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देताना शेतकऱ्यांचे हित याद्वारे जपण्याचा बाजार समितीचा मानस आहे. यामुळे संगणकीय लिलाव प्रणाली ही शेतकऱ्यांसाठी हिताची ठरणारी आहे.
गांडूळ खत प्रकल्प
बारामतीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती आणि उपबाजार समिती जळोची येथे गांडूळखत आणि शेणखत प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. 4000 रुपये टन अशा भावाने हे खत शेतकऱ्यांसाठी विक्रीकरीता उपलब्ध आहे. या प्रकल्पातून महिन्याला एक ते दीड लाख रुपये उत्पन्न बाजार समितीला मिळते. या खर्चातून बाजार समितीच्या स्वच्छतेवर होणारा खर्च भागवला जातो. या प्रकल्पामुळं समितीत निर्माण होणारा कचरा समितीतच जिरवला जातो. याद्वारे परिसरात स्वच्छताही राखली जात आहे.
रेशीम कोष खरेदीला प्रतिसाद
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती बाजार समितीत रेशीम कोष खरेदीची सुरुवात झाली आहे. परिसरातील अनेक शेतकरी रेशीम उद्योग करतात. मात्र, रेशीम कोषाची विक्री करण्याची सोय उपलब्ध नसल्याने त्यांना कर्नाटकात जावे लागत होते. पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागातल्या शेतकऱ्यांची सोय व्हावी म्हणून बारामतीत ही सोय उपलब्ध करण्यात आली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून या सुविधेचा शेतकऱ्यांना लाभ होत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीची वैशिष्ट्य्े
- पुण्यासह सातारा, सोलापूर आणि नगर जिल्ह्यातून फळे आणि भाजीपाल्याची आवक
- मुख्य बाजार समिती अंतर्गत सुपे आणि जळोची येथे उपबाजार समित्या
- जळोची इथं सुरू असणारा जनावरांचा बाजार महाराष्ट्रात प्रसिद्ध
- इलेक्ट्रॉनिक वजनकाटे
- ऑनलाइन पेमेंट
- सुसज्ज यांत्रिक चाळणी यंत्रणा
- परिसराचं सौंदर्य जपण्यावर भर
- चहा, नाश्त्यासह भोजनासाठी स्वतंत्र सोय
- शेतकऱ्यांसाठी विविध मेळाव्यांसह उपक्रमांचं आयोजन
शेतकऱ्यांचे सहकार्य आणि अजितदादांचे मार्गदर्शन
पुण्यापेक्षा बारामतीत चांगल्या पद्धतीनं कांदा, डाळींब आणि धान्य बाजर सुरू झालेला आहे. त्यामुळं शेतकर्यांनी आपला माल बारामतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत द्यावा. त्यांच्यासाठी विविध सोयी सुविधा देण्यात आल्या असून त्याचा फायदा त्यांनी घ्यावा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे यांचेही सहकार्य बाजार समितीला नेहमीच असते. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच समितीचे काम प्रगतीपथावर आहे.
– शौकत कोतवाल,
सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती
शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत तालुक्यातून केवळ 15 टक्के आवक होते. समितीत होणारी 85 टक्के आवक ही बाहेरील आहे. हे या समितीचे वैशिष्ट्य्च म्हणावे लागेल. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिल्यामुळेच हे शक्य झाले. अत्याधुनिक यंत्रणा, अचूक आणि गतिमान कारभार, व्यवहारातली पारदर्शकता यामुळे शेतकर्यांच्या विश्वासाला बाजार समिती पात्र ठरली आहे. भविष्यात शेतकर्यांच्या दृष्टीने अधिकाधिक फायदेशीर निर्णय घेण्यावर आमचा भर राहील.
– अरविंद जगताप,
सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती
संकलन: प्रमोद ठोंबरे