मुंबई – ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलिज झाल्यापासून वाद निर्माण झाला आहे. काहींनी हा चित्रपट प्रपोगंडा असल्याची टीका सोशल मीडियाद्वारे केली आहे. तर काही जण या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. मात्र हा चित्रपट आजपासून चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. परंतु वाद झाल्यानंतरही या चित्रपटाला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी शशी थरूर यांनी या चित्रपटाबाबत एक ट्विट केले होते. यात त्यांनी लिहिले होते की, ”केरळमधील 32,000 महिलांच्या कथित धर्मांतराचा प्रचार करणाऱ्यांसाठी हा दावा सिद्ध करण्याची आणि पैसे कमावण्याची ही संधी आहे. ते आव्हान स्वीकारण्यास तयार होतील की त्यांच्याकडे पुरावे नाहीत, मुळात पुरावे अस्तित्वातच नाही?” यासोबत थरूर यांनी एक फोटो शेअर केला होता.
थरूर यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये ‘केरळमधील 32,000 महिलांनी इस्लाम स्वीकारला, हा दावा सिद्ध करणारे पुरावे सादर करा आणि एक कोटी रुपये जिंका’ असं चॅलेंज दिले होते. त्यानंतर केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी या चित्रपटाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
Mumbai| I have not watched the film, those who’re responsible for maintaining peace and law & order must look into this. If there are love jihad incidents in Kerala, it’s the state govt’s responsibility to take steps against it. I don’t want to comment on the allegations that… pic.twitter.com/QcD5UejDV3
— ANI (@ANI) May 5, 2023
आरिफ मोहम्मद खान म्हणाले की, “राज्यातील कोणत्याही ‘लव्ह जिहाद’च्या घटनांविरोधात पावले उचलणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. मी हा चित्रपट पाहिला नाही, शांतता आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांनी याकडे लक्ष द्यावे. केरळमध्ये लव्ह जिहादच्या घटना घडत असतील तर त्याविरोधात कठोर कारवाई करण्याचे काम राज्य सरकारचे आहे.” यावेळी त्यांनी ‘द केरला स्टोरी’ हा प्रोपगंडा चित्रपट असल्याच्या आरोपांवर भाष्य करण्यास नकार दिला.