लखनौ – उत्तरप्रदेशचे 18 मंत्री आठवडाभरात त्यांच्या पदांचे राजीनामे देतील. दररोज एक-दोन मंत्री मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडतील, असा दावा प्रभावी ओबीसी नेते ओमप्रकाश राजभर यांनी बुधवारी केला.
स्वामीप्रसाद मौर्य आणि दारासिंह चौहान या उत्तरप्रदेशच्या दोन मंत्र्यांचा राजीनामा सत्तारूढ भाजपसाठी मोठा राजकीय हादरा मानला जात आहे. अशात भाजपची चिंता आणखी वाढवणारे वक्तव्य सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (एसबीएसपी) अध्यक्ष राजभर यांनी केले.
दलित, मागास आणि वंचित घटकांशी भाजपला काही देणे-घेणे नसल्याचे काही काळातच माझ्या लक्षात आले. मात्र, इतरांनी प्रतीक्षा केली. आता कुठलीच आशा न उरल्याने अनेक मंत्री राजीनामे देतील, असे त्यांनी म्हटले.
अशातच उत्तरप्रदेशमध्ये शिवसेना पन्नास ते शंभर जागा लढवणार आहे. आज खासदार संजय राऊत उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहे. यावेळी ते शेतकरी नेते राकेश टिकेत यांची मुजफ्फरनगरमध्ये भेट घेणार आहे. याच दौऱ्यादरम्यान, संजय राऊत यांनी प्रतिक्रिया भाजपा पक्षातील मंत्र्याच्या राजीनामाबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले शिवसेना खासदार संजय राऊत
उत्तर प्रदेशची हवा काही राजकारण्यांना हवा पटकन कळते, त्यामुळे ते पक्ष बदलत असतात. निवडणुकीच्या तोंड्यावर कितीही ओपिनियन पोल सत्ताधाऱ्यांच्या बाजून देत असले तरी जमिनीवरचे सत्य वेगळे आहे.”
ते पुढे म्हणाले,’या निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपाला विजय मिळेल शक्य नाही. या निडणुकीसाठी सगळे विरोधीपक्ष एकवटले आहेत.’